Posts

Showing posts from March, 2020

कोरोनाच्या भीतीने टेंभुर्णीत शुकशुकाट

Image
कोरोनाच्या भीतीने टेंभुर्णीत शुकशुकाट टेंभुर्णी (प्रतिनिधी) कोरोनाच्या भीतीने टेंभुर्णीत शुकशुकाट पाहायला मिळाला.कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलीय.अत्यावश्यक वगळता सर्व दुकानेदेखील बंद करून घरात बसावे,असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलाय.कोरोना आजाराच्या भितीमुळे ग्राहक बाजारात खरेदीसाठी येणेच टाळत आहे.सोमवार दि.३० रोजी टेंभुर्णी परिसरातील एस टी स्टॅन्डसह,इतर भागात मोठा शुकशुकाट पहायला मिळाला.ज्या ठिकाणी दिवसभर नेहमीच नागरिकांची गर्दी दिसायची तिथे एकाही व्यक्ती दिसले नाही.नागरिकांच्या मनात कोरोना व्हायरसबाबत भीती निर्माण झाली आहे.नागरिक फक्त काम असले तरच घराबाहेर पडत आहे.बाजारपेठेत मंदीचे सावट तर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे व्यापारीही धास्तावले आहेत.मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोडसह परिसरातील मोठ-मोठी दुकाने ओस पडल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक गरजेच्या गोष्टी वगळता,अन्य वस्तूंची खरेदी पुढे ढकलण्याचा पर्याय नागरिकांकडून स्वीकारला जाताना दिसत आहे.

कोविड-१९ धोरणाबाबत रतन एन टाटा यांचे निवेदन

Image
कोविड-१९ धोरणाबाबत रतन एन टाटा यांचे निवेदन सोलापूर (प्रतिनिधी) भारतात आणि जगात सर्वत्र परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे आणि यावेळी तातडीने कृती करणे गरजेचे आहे.टाटा ट्रस्ट्स आणि टाटा ग्रुपच्या कंपन्यांनी याआधी देखील गरजेच्या प्रत्येक वेळी देशाची मदत केली आहे.भारतातील नामांकित उद्योग समूह असलेल्या टाटा ग्रुपने कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी ५०० कोटींची मदत जाहीर केली आहे.आजवरच्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक कोविड १९ विरोधातील लढाईसाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी तात्काळ आपत्कालीन साधने तैनात करणे गरजेचे आहे.टाटा ट्रस्ट्स,टाटा सन्स आणि टाटा समूहातील कंपन्या आपल्या स्थानिक व जागतिक सहयोगी आणि सरकार यांच्यासोबत मिळून वंचित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका संयुक्त सार्वजनिक आरोग्य सहयोग मंचावर या संकटाविरोधात लढत आहेत.या आजाराविरोधात लढण्यासाठी आपले जीवन आणि आपली सुरक्षा धोक्यात घालून काम करत असलेल्या सदस्य संघटनांमधील प्रत्येक व्यक्तीबद्दल आमच्या मनात अतिशय सन्मान व कृतज्ञता आहे आणि आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. टाटा ट्रस्ट्स, सर्व संकटग्रस्त समुदायांची ...

पंढरपूर शहरात मॉर्निंग वॉकसाठी रस्त्यावर फिरणाऱ्या 24 जणांवर कारवाई

Image
पंढरपूर शहरात मॉर्निंग वॉकसाठी रस्त्यावर फिरणाऱ्या 24 जणांवर कारवाई  पंढरपूर प्रतिनिधी: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात संचार बंदी  लागू करण्यात आली आहे.नागरीकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत राहील यासाठी प्रशासन प्रशासन सज्ज आहे. नागरीकांनी  अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन  उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे व पंढरपूर शहर पोलिस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री.अरुण पवार यांनी केले आहे.       संचारबंदी लागू असताना देखील काही नागरीक विनाकारण घराबाहेर पडत आहेत.अत्यावश्यक कारण असल्याशिवाय नागरीकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. मात्र नागरीकांकडून त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. आज दि.31/03/2020 रोजी सकाळी 05:00 ते 07:00 या वेळेत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील टाकळी रोड, नवीन कराड नाका रोड, लिंक रोड, इसबावी या भागात नागरीक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले आढळून आले.  अशा विनाकारण रस्त्याने बाहेर फिरणाऱ्या 24 नागरीकांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी...

राज्यातील रुग्णांची संख्या २२५ वर

Image
राज्यातील रुग्णांची संख्या २२५ वर भारतानं अद्याप करोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला नसल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं असलं तरी करोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. करोना रुग्णांमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढं असून राज्यातील आकडा आतापर्यंत २२० वर गेला आहे. मुंबई:  महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा सातत्यानं वाढत असून आतापर्यंत हा आकडा २२० वर गेला आहे. चिंतेची बाब म्हणून २१ ते ३० या वयोगटातील सर्वाधिक तरुण रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.

पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह घेऊन तो ८८ किमी चालला

Image
पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह घेऊन तो ८८ किमी चालला ही बातमी समोर येण्यासाठी एक आठवडा लागला देशामध्ये २४ एप्रिलपासून करोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्याच दिवशी आंध्र प्रदेशमधील एका बापाला सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्याने आपल्या पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह घेऊन ८८ किलोमीटरची पायपीट करावी लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. एका लहानश्या खेड्यात राहणाऱ्या या वक्तीला आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करण्यासाठी इतकं अंतर पायी चालावं लागलं. लॉकडाउनमुळे देशातील अनेक भागांमध्ये संचारबंदीचे कडोकोरपणे पालन केलं जात आहे. त्यामुळेच अनंतपुरम जिल्ह्यातील गोरांतला गावातील ही बातमी समोर येण्यासाठी एक आठवडा लागला. मनोहर (३८) असं या व्यक्तीचं नाव असून तो रोजंदारीवर काम करतो. मनोहरचा पाच वर्षांचा मुलगा देवा हा अचानक आजारी पडला. घशाचा संसर्गाचा त्रास देवाला होत होता. त्यावच उपचार करण्यासाठी आधी देवाला स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र देवाची प्रकृतीमध्ये काहीच सुधारणा होत नव्हती. उलट त्याची प्रकृती खालावत चालल्याने त्...

डिव्हीपी समूहाची सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम

Image
डिव्हीपी समूहाची सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम पोलिसांना मोफत जेवण देत केला कार्याला अनोखा सलाम पंढरपूर प्रतिनिधी: कोणत्याही सामाजिक कार्यात सर्वात अग्रेसर समूह अशी ओळख असलेल्या पंढरीतील डिव्हीपी(कै.धनंजय विठ्ठल पाटील)समूहाने आजवर अनेक मोठं मोठे उपक्रम राबवत आपली सामाजिक बांधीलकी जपली आहे.मग अनाथांसाठी जेवण असो की वृद्ध निराधारांना मदतीचा हात असो,अंधांना आधार असो की अनाथ  मुलांना मोफत सिनेमा दाखविणे असो.आजवर या समूहाने हजारो जणांना मदतीचा हात देत उद्योग समूह कसा असावा याचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे.त्यातच सोमवारी ३० मार्च रोजी आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.जगभरात कोरोनाने (कोविड-१९) थैमान घातल्याने एकीकडे जग भयभीत झाले आहे.भारतातही याचा शिरकाव झाल्याने याचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले आहे.त्यामुळे पोलिसांना दिवसरात्र आपल्या कामासाठी झटावे लागत आहे.अशा कठीण काळात त्यांना चांगले जेवण मिळावे व पोलिसांची मदत करून कार्याला सलाम करता यावा याकरता डिव्हीपी उद्योग समूहाने पंढरीतील डॉक्टर,नर्सेस,पोलीस प्रशासन,महसूल अधिकारी,कर्मचारी व पत्रकार...

पंढरपूर पोलिसांचा विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा

Image
पंढरपूर पोलिसांचा विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा तालुका हद्दीतील २० तर शहरातून २१ दुचाकी ताब्यात पंढरपूर प्रतिनिधी: जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू असून याचा फैलाव रोखण्यासाठी भारतात सरकारकडून जमावबंदी, संचारबंदी तसेच १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे.याचा अंमल महाराष्ट्र सरकारकडून राबविला जात असून नागरिकांनी रस्त्यावर विनाकारण फिरु नये,घराबाहेर विनाकारण पडू नये यासाठी सरकार व पोलीस प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात असतानाही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत.पंढरपूर तालुक्यातील नागरीकही मोठ्या प्रमाणात विविध कारणांनी पंढरपूरला येत असल्याने त्यांना अटकाव करण्यासाठी व रोखण्यासाठी पोलिसांकडून कडक उपाययोजना राबविल्या जात आहेत.याचाच एक भाग म्हणून काल अत्यावश्यक कारणांशिवाय रस्त्यांवर फिरणाऱ्या ५२ दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली.             पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथील तीनरस्ता परिसरात पंढरपूर तालुका पोलिसांनी तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी यंत्रणा राबवत काल तब्बल २० वाहनांवर कारवाई केली.य...

निराधार करिता निवारा कक्ष ; करमाळा नगरपालिकेचा उपक्रम

Image
निराधार करिता निवारा कक्ष  ; करमाळा नगरपालिकेचा उपक्रम         करमाळा (प्रतिनिधी) कोरणा विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातील निराधारांसाठी नगरपालिकेच्या वतीने निवारा कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी विना पवार यांनी दिली अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या   कि, निराधार लोकांची सोय होत नसल्याचे लक्षात आल्याने करमाळा नगरपालिकेच्या वतीने जुनी नगरपालिका कार्यालय व महात्मा गांधी विद्यालय येथे निराधारांसाठी निवारा कक्षाची सोय करण्यात आलेली असून 24 तास हा कक्ष चालू राहील तसेच काही संस्थांच्या वतीने ही जेवणाची सुविधा करण्यात आलेली आहे यामुळे निराधारांची राहण्याची व जेवणाची दोन्ही सोय झालेली आहे.

गुटखा साठवणूक व विक्री प्रकरणी दोघांवर तर पाच जणांवर जुगाराचा गुन्हा

Image
गुटखा साठवणूक व विक्री प्रकरणी दोघांवर तर पाच जणांवर जुगाराचा गुन्हा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल पंढरपूर प्रतिनिधी: राज्यात संचारबंदी लागू असतानाही दुचाकीवरून फिरणाऱ्या चार जणांवर कलम १८८ प्रमाणे संचारबंदी उल्लंघनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये १.कमलाकर दिनकर गोफणे(देगाव ता.पंढरपूर),२.महेश कुबेर पवार (शिरभावी ता.सांगोला),३.धनाजी शंकर भातुगडे(शिरभावी ता.सांगोला) अन्य एक अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर संचारबंदी व जमावबंदी लागू असतानाही जुगार(तीन पानी तिरट)खेळताना ६००० रुपयांच्या मुद्देमालासह कोंढारकी ता.पंढरपूर येथे १.जालिंदर विष्णू थिटे(रा.अनगर ता.मोहोळ),२.बापू भास्कर दांडगे, (कोंढारकी),३.मच्छीन्द्र ताड(एकलासपूर ता.पंढरपूर),४.रवींद्र शंकर दांडगे (कोंढारकी),५.शिवाजी सोपान पाटील (कोंढारकी) व ६.अनिल कापसे (कोंढारकी) यांच्यावर  तीन पानी जुगार खेळताना रंगेहाथ पकडून कलम १८८ व जुगार प्रतिबंधक कायदा व साथीचा रोग प्रतिबंधक कायद्यानुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच बंदी असतानाही गुटखा साठवण केल्याप्रकरणी बंडू...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 300 हून अधिक गुन्हे दाखल

Image
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 300 हून अधिक गुन्हे दाखल सोलापूर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी 300 हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये जवळपास 864 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर संचारबंदी लागू असताना कोणत्याही कारणाविना फिरणाऱ्या लोकांचे थेट वाहनच पोलिसांनी जप्त केले आहे. जवळपास 43 वाहने आतापर्यंत सोलापूर ग्रामीणच्या पोलिसांनी जप्त केली आहेत. 23 मार्चपासून आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार 511 तर मोटार व्हेईकल ऍक्टनुसार 4471 वाहनचालकांवर सोलापूर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. राज्यभरात संचारबंदी लागू असल्याने लोकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे. दरम्यान दुचाकी वाहनावर अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडताना लोकांनी एका गाडीवर एकट्यानेच बाहेर पडावे, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

कारवाई न करण्यासाठी पैशाची मागणी,सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित

Image
कारवाई न करण्यासाठी पैशाची मागणी,सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित सोलापूरमधील एका पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात कारवाई न करण्यासाठी पैशाची मागणी केल्याच्या तक्रारीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिवसेवर पोलीस आयुक्तांनी कारवाई केली आहे. सोलापूर  : संचारबंदीच्या काळात कारवाई न करण्यासाठी पैशाची मागणी केल्याप्रकरणी सोलापुरातील एका पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोलापुरातील औद्योगिक पोलीस चौकीत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे सोलापूरतल्या अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने देखील बंद करून घरात बसावे, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार संपूर्ण सोलापूरमध्ये बंद पाळण्यात आला. परंतु विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई न करण्यासाठी संबंधीत पोलीस अधिकाऱ्याने पैशाची मागणी केली होती. ही घटना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यापर्यत पो...

केळी व तत्सम फळांना दर मिळण्यासाठी शासनाने लक्ष घालावे

Image
केळी व तत्सम  फळांना दर मिळण्यासाठी शासनाने लक्ष घालावे  करमाळा  बाजार समिती चे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांची मागणी करमाळा प्रतिनिधी :   केळी व तत्सम  फळ पिकवणाऱ्या शेतकरी  वर्गाचे  कोरोनाच्या  संकटाच्या  पार्श्वभूमी वर प्रचंड  नुकसान  होत असून व्यापारी  अडवणूक करून अगदी नाममात्र  किमतीवर पिके खरेदी  करत असल्याने शासनाने  यात तात्काळ  लक्ष घालावे अशी मागणी  करमाळा  बाजार समिती चे सभापती प्रा शिवाजीराव बंडगर यानी केली आहे .     याबाबत  अधिक  बोलताना प्रा बंडगर म्हणाले की, तालुक्यातील  उजनी  जलाशय काठावरील  विविध गावात तसेच इतर ही भागातून सध्या केळी  चे परिपक्व  पीक  विक्रीस आले आहे . शेतकरी  लोक व्यापार्याना  संपर्क  करत आहेत .परंतु  व्यापारी   तीन रूपये किलो दरापेक्षा  अधिक दर देत नाहीत.केळी,खरबूज, कलिंगड  आदी पिके नाशवंत  असल्याने परिपक्व  झाला की विकण्याशिवाय  पर्याय...

तांदूळ, गहू आट्टा, तुरदाळ, तिखट, तेल, जिरे, मोहरी, पापड असे किराणा संस्थेच्या निधीतून वाटप

Image
नळदुर्ग :  कोरोना मुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत आरंभ सामाजिक संस्था यांच्या वतीने नळदुर्ग शहरात असलेले निराधार, रोजच्या कमाईतून पोट भरणारे तसेच हातावर पोट असलेले मजूर, परराज्यातून कमावून खाण्यासाठी आलेले नागरिक यांना तांदूळ, गहू आट्टा, तुरदाळ, तिखट, तेल, जिरे, मोहरी, पापड असे किराणा  संस्थेच्या निधीतून वाटप करण्यात आले.    मध्यप्रदेश व राजस्थान येथून भेळ पाणीपुरी विकुन आपले पोट भरण्यासाठी नळदुर्ग शहरातील माऊली नगर येथे वास्तव्यास आहेत गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात लॉकडाउन असल्याने धंदा बंद करून घरी बसावे लागत आहे अजून काही दिवस असेच चालू राहिले तर खाण्यापिण्याची सोय होणार नाही तसेच येथील रेशनकार्ड नसल्याने शासनाची मदत देखील मिळेल की नाही ही चिंता आणि त्यावरून कोरोनाची भीती असल्याने आपल्या मूळगावी जाण्याची घाईत होते, आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अशा कुटुंबाना किराणा मालाची सोय करण्यात आली,  तसेच राज्य व केंद्र शासनाने जिथे आहात तिथे राहण्याचे आवाहन केले आहे त्यामुळे त्यांना काही लक्षणे आहेत का याची विचारपूस करून त्य...

सरकारचा मोठा दिलासा; ७० हजार बेघरांना निवारा

Image
सरकारचा मोठा दिलासा; ७० हजार बेघरांना निवारा मुंबई: करोनाचं राज्यावरील संकट अधिक गहिरं होत आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत हजारो बेघर लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या निवासाचा, उदरनिर्वाहाचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. परराज्यातील हजारो मजूर त्यांच्या गावी जायला निघाले आहेत. मात्र, सरकारनं या बेघर लोकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यभरात त्यांच्यासाठी २६२ मदत केंद्रे उभारली आहेत. तर ७० हजारांहून अधिक स्थलांतरित कामगार आणि बेघर लोकांच्या निवाऱ्याची सोय केली आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. करोनामुळं मृतांची संख्या आणि करोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. या जीवघेण्या करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक निर्बंध उपाय करत आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील कामगार, मजूर आणि बेघरांना स्थलांतर करण्यापासून रोखले जात आहे. ही कठोर पावलं उचलतानाच, राज्य सरकारनं या बेघर लोकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारनं या बेघर लोकांसाठी २६२ मदत केंद्रे उभारली आहेत. या माध्यमातून ७० हजार ...

महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा २१५ वर

Image
महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा २१५ वर मुंबई:  राज्यात करोनाची लागण होण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढतच असून काल रात्रीपासून आणखी १२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात मुंबई, पुण्यासह पाच शहरांतील रुग्णांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळं राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा २१५ वर गेला आहे. राज्यात काल रात्रीपासून वाढलेल्या रुग्णांमध्ये पुण्यातील पाच, मुंबईतील तीन, नागपूरमधील दोन तसंच, नाशिक व कोल्हापुरातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. उपचारानंतर बऱ्या झालेल्या व रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ३८ झाली आहे. या सर्वांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सुरुवातीला एका आकड्यात वाढणारे करोनाचे रुग्ण आता दोन आकड्यांत वाढू लागले आहेत. ही राज्यासाठी चिंताजनक बाब मानली जात आहे. करोनाची लागण ही वैयक्तिक संपर्कातून होत असल्यानं राज्य सरकारनं लॉकडाऊनची अंमलबजावणी कठोरपणे सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांसह सर्व जबाबदार नेतेमंडळी करत आहेत. करोनाचा तिसरा...

मुंबई: चेंबूर पोलीस ठाण्यात पोलिसाची आत्महत्या

Image
मुंबई: चेंबूर पोलीस ठाण्यात पोलिसाची आत्महत्या मुंबई:  चेंबूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक  संपत गाढवे (५८) यांनी पोलीस ठाण्यातील भंडारगृहात गळफास लावून आत्महत्या केली. आज दुपारी पोलिस ठाण्यातील हवालदार ड्युटीवर आले. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. गाढवे यांना घशाचा कर्करोग होता. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. घटनास्थळी चिठ्ठी सापडली असून यामध्ये आजाराला कंटाळून जीवन संपवित असून यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असे गाढवे यांनी नमूद केले आहे. चेंबूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आजारी असलेल्या गाढवे यांना भंडारगृहाची ड्युटी देण्यात आली होती. तिथंच त्यांनी गळफास घेतला. ही घटना घडली तेव्हा बहुतेक सर्व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी बाहेर गेलेले होते. गाढवे यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. गाढवे यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मुंबई पोलीस  स...

देशात अद्याप करोनाचा समूह संसर्ग नाहीः आरोग्य मंत्रालय

Image
देशात अद्याप करोनाचा समूह संसर्ग नाहीः आरोग्य मंत्रालय देशात अद्याप करोनाचा समूह संसर्ग नाहीः आरोग्य मंत्रालय नवी दिल्लीः  भारतात अजून करोना व्हारसच्या समूह संसर्गाला सुरुवात झालेली नाही. देश अजून करोनाच्या दुसऱ्या टप्प्यावर आहे, असं स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलंय. देशात करोना व्हायरसा प्रादुर्भाव समूहांमध्ये अतिशय मर्यादित प्रमाणात सुरू झाल्याचं सांगण्यात येत होतं. भारतात करोनाच्या दुसऱ्या टप्प्यावर आहे. विकसित देशांच्या तुलनेत भारताने प्रभावी आणि वेळेवर उपाययोजना राबवल्याने करोनाचा संसर्ग हा समूहांमध्ये फैलावलेला नाही. पण तरीही सर्वांनी नियमांचं पालन करावं आणि काळजी घेण्याची गरज आहे, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना नव्याने काही निर्देशही जारी केले आहेत. देशात आतापर्यंत करोनाने २९ मृत्यू झाला आहेत. तर १०७१ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या २४ तासांतील ही आकडेवारी आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचि...

राज्यभरातील ग्राहकांना दिलासा; वीज दरात मोठी कपात

Image
राज्यभरातील ग्राहकांना दिलासा; वीज दरात मोठी कपात मुंबई  : राज्य सरकारने वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य वीज नियामक आयोगाने राज्य सरकारच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार न पडू देता स्वस्तात वीज देण्याचं नियोजन केलं आहे. वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती विजेच्या वापरात ५-७ टक्के, व्यावसायिक दरात १०-१२ टक्के आणि औद्योगिक दरात १०-११ टक्क्यांनी कपात करण्यात येणार आहे. नवे दर १ एप्रिल २०२० पासूनच लागू होणार असल्यामुळे ग्राहकांना पुढच्या बिलापासूनच दिलासा मिळणार आहे. वीज नियामक आयोगाच्या माहितीनुसार, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र या प्रमाणे वीज दरात कपात करण्यात आली आहे. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या आयोगाच्या आदेशानुसार दर कमी करतील. तर उर्वरित महाराष्ट्रासाठीचे दर महावितरणकडून कमी केले जातील.

“सरकारने मदत केली नाही तर सहा महिन्यात ३० टक्के रिटेल दुकानं होतील बंद”

Image
“सरकारने मदत केली नाही तर सहा महिन्यात ३० टक्के रिटेल दुकानं होतील बंद” रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सीईओ राजगोपालन यांचं वक्तव्य X सरकारने मदत केली नाही तर सहा महिन्यात ३० टक्के दुकानं बंद होतील असं वक्तव्य रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सीईओ राजगोपालन यांनी केलं आहे. घाऊक आणि किरकोळ विक्री करणाऱ्यांपैकी किरकोळ विक्री करणाऱ्यांवर फेब्रुवारीपासूनच संकट आलं आहे. अशात आता करोनाच्या संकटामुळे किरकोळ व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवर टाच येण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात हा कारभार ६० टक्क्यांपर्यंत होता. आता मार्चमध्ये हा कारभारातली उलाढाल शून्यावर आली आहे. त्यामुळेच ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ३० टक्के दुकानं सहा महिन्यात बंद होतील अशी शक्यता वर्तवली आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे पुढे रिटेल दुकानदारांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत असंही राजगोपालन यांनी म्हटलं आहे. सध्या रिटेल दुकानदार यांचे ८५ टक्के खर्च ठरलेले आहेत. जर या सगळ्या परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप केला नाही तर ३० टक्के किरकोळ व्यावसायिकांची दुका...