देशात अद्याप करोनाचा समूह संसर्ग नाहीः आरोग्य मंत्रालय

देशात अद्याप करोनाचा समूह संसर्ग नाहीः आरोग्य मंत्रालय


देशात अद्याप करोनाचा समूह संसर्ग नाहीः आरोग्य मंत्रालय
नवी दिल्लीः भारतात अजून करोना व्हारसच्या समूह संसर्गाला सुरुवात झालेली नाही. देश अजून करोनाच्या दुसऱ्या टप्प्यावर आहे, असं स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलंय. देशात करोना व्हायरसा प्रादुर्भाव समूहांमध्ये अतिशय मर्यादित प्रमाणात सुरू झाल्याचं सांगण्यात येत होतं.

भारतात करोनाच्या दुसऱ्या टप्प्यावर आहे. विकसित देशांच्या तुलनेत भारताने प्रभावी आणि वेळेवर उपाययोजना राबवल्याने करोनाचा संसर्ग हा समूहांमध्ये फैलावलेला नाही. पण तरीही सर्वांनी नियमांचं पालन करावं आणि काळजी घेण्याची गरज आहे, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना नव्याने काही निर्देशही जारी केले आहेत.

देशात आतापर्यंत करोनाने २९ मृत्यू झाला आहेत. तर १०७१ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या २४ तासांतील ही आकडेवारी आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. तसंच ईशान्येतील राज्यांना मालवाहतूक विमानांद्वारे अत्यावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठा करण्याला मंजुरी देण्यात आली आहे.

रविवारी करोनाच्या ३,५०१ चाचण्या ICMRमध्ये करण्यात आल्या आहेत. तर गेल्या तीन दिवसांत खासगी लॅबकडून १, ३३४ चाचण्या केल्या गेल्या आहेत. आतापर्यंत करोनाच्या एकूण ३८, ४४२ चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.

Comments


Popular posts from this blog

बार्शीत ठेकेदाराचा मृत्यू . तपास सीआयडी कडे . पुणे सीआयडी पथक बार्शीत दाखल .

पासपोर्ट धारकांनो काळजी घ्या; सायबर विभागानं केलं महत्वाचं आवाहन

पत्नी झोपेत असताना अंगावर पेट्रोल टाकून दिले पेटवून