Posts

पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी नऊ जणांविरुध्द गुन्हा

Image
पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी नऊ जणांविरुध्द गुन्हा   सोलापूर (प्रतिनिधी) रस्त्यावर जमलेल्या लोकांना घरी जाण्यास सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांच्यावर दगडफेक करणाऱ्या  नऊ जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.ती घटना लष्कर परिसरातील नळबाजार भागात घडली.मुकेश किशनसिंग बोधीवाले (वय 35, रा. लोधी गल्ली) याच्यासह त्याची आई, मेव्हणा व इतर पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कर्मचारी मल्लू महादेव बिराजदार हे आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत पेट्रोलिंग करीत असताना लष्कर येथील मुर्गी नाला परिसरात रोडवर जमलेल्या लोकांना घरी जाण्यास सांगत होते.तेव्हा आरोपी मुकेश याने तुम मेरे को पहचानता नही, मै इधर का भाई हु,असे मनात रोडवर पडलेल्या फरशीच्या व दगडाच्या तुकड्याने मल्लू बिराजदार यांच्यावर फेकून मारून जखमी केले.तेव्हा इतर सहकारी पोलीस सोडविण्यासाठी आले असता त्यांच्याशी वादविवाद करून गच्ची पकडून शिवीगाळ केले.तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.तपास पोलिस नाईक पाटील हे करीत आहेत.

मोहोळ न्यायालयात शुक्रवारी कोरोनाने लावली हजेरी

Image
मोहोळ न्यायालयात शुक्रवारी कोरोनाने लावली हजेरी... सोलापूर शहरात राहणारे सरकारी बाबू मोहोळसाठी ठरताहेत कोरोना वाहक...  मोहोळ तालुका ( प्रतिनिधी ) मोहोळ शहर व तालुक्यात कोरणा रुग्णांची संख्या वाढत असताना शुक्रवारी कोरोनाने मोहोळच्या न्यायालय देखील हजेरी लावली. मोहन न्यायालयात कार्यरत असणाऱ्या सोलापुरात वास्तव्यास असणाऱ्या एका लिपिकाचा अहवाल पॉझिटिव आला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने न्यायालयातील पाच जणांना क्वॉरंटाईन केले आहे.             लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर मोहोळ शहर व तालुक्यात सर्वच शासकीय कार्यालयात गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे. परिणामी तालुक्यात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मोहोळ शहर व तालुक्यात धोका कमी होण्याऐवजी आणखीन वाढतच चालला आहे.  सोलापूर शहरात सध्या हजाराच्यावर कोरोनाचे रुग्ण आहेत. सोलापूर शहरातील अनेक परिसर कन्टोनमेंट झोन घोषित केलेले आहेत. या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या सरकारी बाबूंना प्रशासनाने सोलापुरातून नोकरीच्या ठिकाणी ये-जा न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र सरकारी...

सोलापुरात रखवालदाराच्या मुलाकडून महिलेचा गळा दाबून खून

Image
सोलापुरात  रखवालदाराच्या मुलाकडून महिलेचा गळा दाबून खून होटगी रोड परिसरातील घटना मोबाईलमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अनैतिक संबंधातूनच खून झाल्याची चर्चा   सोलापूर (प्रतिनिधी) होटगी रोड परिसरातील एका अपार्टमेंटचा रखवालदार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या मुलाने शेजारी बंगल्यात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली.ही घटना २७ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.या गुन्ह्यातील संशयित आरोपीला विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे.        याबाबत मिळालेली माहिती अशी की, होटगी रोड परिसरात मोहिते नगर भागात कैकशा अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंट शेजारी गंगाधर निवास नावाचा बंगला आहे. या बंगल्यात नागमणी नावाच्या महिला एकटाच राहत होत्या. तर बंगल्याच्या पाठीमागील बाजूस लागूनच पत्र्याचे शेड आहे. या पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी राहण्यास आहे.२७ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आरोपी सैफअली अशरफ शेख हा बंगल्याच्या पाठीमागील संरक्षक भिंतीवरून उडी मारून आत आला. बंगल्याच्या पाठीमागील दरवाजाजवळ तो काहीवेळ घुटमळत होता.त्याने प...

सोलापुरात पुन्हा ९ जणांचा कोरोनाने मृत्यू ; कोरोनाबाधित संख्या १९३० वर

Image
सोलापुरात पुन्हा ९ जणांचा कोरोनाने मृत्यू ; कोरोनाबाधित  संख्या  १९३० वर   सोलापूर : जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करुनही सोलापुरातील कोरोनाबाधित मृतांची संख्या कमी होत नसल्याचे चित्र पुन्हा पहायला मिळाले. रविवारी (ता. 21) शहरातील 70 वर्षांवरील सहा तर 58 वर्षांवरील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 222 अहवालात 39 रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मृतांची संख्या कमी करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्‍त करुनही शहरातील मृतांची संख्या आता 170 वर पोहचली आहे.  रविवारी या भागात सापडले 39 रुग्ण  अवंतीनगर, भवानी पेठ, अवैद्यनगर हैदराबाद रोड, मोदी, रुपाभवानी मंदिराजवळ, जुना विडी घरकूल, बिलाल नगर, जुळे सोलापूर, माशाळ वस्ती, उपलप मंगल कर्यालयाजवळ, आनंद नगर, विजयपूर रोड, चंद्रकिरण अर्पाटमेंट, एम्पलॉयमेंट चौक, अशोक नगर, विजयपूर रोड, पद्मानगर, अक्‍कलकोट रोड, मनपा मुलांची शाळा क्र.4, उत्तर कसबा, टिळक चौक, नियर गणपती मंदिराजळव, उत्तर कसबा, सिध्देश्‍वर नगर, वसंतराव नाईक शाळेजवळ, उत्तर कसबा, तनिष्क रेसिडेन्सी, भवानी पेठ, स्वामी विवेकानंद नगर, दत्तर...

सीबीआय अधिकारी बनून लुटायचे

Image
सीबीआय अधिकारी बनून लुटायचे   नवी दिल्ली: सीबीआय अधिकारी बनून अनेकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. आतापर्यंत या टोळीनं ३६ ठिकाणी लूट केल्याचं समोर आलं आहे. मैदानगढी ठाण्याच्या पोलिसांनी या टोळीतील लुटारूंच्या मुसक्या आवळल्या आहेत, अशी माहिती दिल्लीचे डीसीपी अतुल ठाकूर यांनी दिली.या टोळीचा म्होरक्या लखविंदर सिंग उर्फ शिवा हा मूळचा पंजाबचा राहणारा आहे. ऐशोआरामाचं आयुष्य जगण्यासाठी आणि गर्लफ्रेंडसाठी तो हा लुटीचा पैसा खर्च करायचा. मौजमस्ती करण्यासाठी लखविंदरनं सोनू कुमार आणि सनी या दोन साथीदारांना घेऊन अनेक ठिकाणी लूट केली आहे. बॉलिवूड चित्रपटांतून त्यांना ही 'आयडीया' सूचली. लॉकडाउनच्या काळात अनेक ठिकाणी लूट करून मौजमस्ती करण्यासासाठी ते गोव्यालाही गेले होते. तेथील कसिनोमध्ये त्यांनी सात लाख रुपयेही खर्च केल्याचं पोलीस चौकशीत उघड झालं आहे. गैरमार्गानं मिळवलेल्या पैशांतून ते गुरुग्राममधील नाइट क्लबमध्ये जायचे, अशी कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन अलिशान कार आणि दागिने हस्तगत केले आहेत. लख...

गर्भवती महिलेने ग्रहण काळातील अंधश्रद्धांना दिली मूठमाती!

Image
गर्भवती महिलेने ग्रहण काळातील अंधश्रद्धांना दिली मूठमाती! कोल्हापूर: ग्रहण काळात वैज्ञानिक दृष्टिकोनापेक्षा अंधश्रद्धांचीच अधिक चर्चा होते. विशेषतः गर्भवती महिलांवर अनेक निर्बंध घातले जातात. इस्लामपुरातील (जि. सांगली) समृद्धी चंदन जाधव या गर्भवतीने मात्र ग्रहण काळात पाळल्या जाणाऱ्या सर्व प्रथा आणि अंधश्रद्धांना मूठमाती दिली. महाराष्ट्र अंनिसने याबाबत पुढाकार घेऊन ग्रहणाबाबत असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी उपक्रम आयोजित केला होता.इस्लामपुरातील महात्मा फुले कॉलनीमध्ये गर्भवती महिला समृद्धी जाधव यांनी रविवारी पिढ्यानपिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या अंधश्रद्धा दूर केल्या. ग्रहणाच्या काळात भाजी चिरणे, फळे कापणे, झाडांची फळे, पाने तोडणे, अन्न खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे यासह विविध शारीरिक हालचाली करत ग्रहण पाहण्याचाही आनंद घेतला. समृद्धी या बारावी उत्तीर्ण आहेत. त्यांनी चंदन जाधव या युवकाशी आंतरजातीय विवाह केला आहे. समृद्धी यांच्या सासू सिंधुताई जाधव आणि कुटुंबीयांनी त्यांना अंधश्रद्धा, गैरसमज दूर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. गर्भवती महिलांनी ग्रहण पाळणे ही अंधश्रद्धा असल्याचा संदेश सर्वांन...

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या ४ हजारांच्याही पुढे; २४ तासांत ८८ नवे पॉझिटिव्ह

Image
राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या ४ हजारांच्याही पुढे; २४ तासांत ८८ नवे पॉझिटिव्ह जाणून घ्या, आतापर्यंत किती पोलिसांचा झाला करोनामुळे मृत्यू करोना विरोधात देशाच्या सुरू असलेल्या लढ्यातील आघाडीच्या योद्धांपैकी एक असलेले पोलीस देखील करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. मागील २४ तासांत राज्यात ८८ पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले असून, एका पोलिसाचा करोनानेमुळे मृत्यू झाला आहे. तर, राज्यातील करोनाबाधित पोलीसांच्या संख्येना आता ४ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात करोनाबाधित पोलिसांची संख्या ४ हजार ४८ वर पोहचली आहे. तर, आतापर्यंत ४७ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. महाराष्ट्र पोलिस विभागाकडून ही माहिती मिळाली आहे. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.  या अगोदर काल ४८ तासांत १४० पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळल्याची नोंद झाली होती. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा देशात कहर सुरू असल्याचे दिसत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल १५ हजार ४१३ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, ३०६ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. देशभरातील  करोनाबाधितांच्या संख्येने आता चार लाखांचा ...

धक्कादायक! राजधानी दिल्ली हाय अलर्टवर; दहशतवाद्यांकडून रचला जातोय हल्ल्याचा कट

Image
धक्कादायक! राजधानी दिल्ली हाय अलर्टवर; दहशतवाद्यांकडून रचला जातोय हल्ल्याचा कट नवी दिल्ली :  कोरोनाच्या संकटात राजधानी दिल्लीवर आणखी एक संकट घोंगावत आहे. दिल्ली राजधानीत दहशतवादी प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांना यासंदर्भात हाय अलर्ट लागू केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी दिल्लीत घुसण्याचा प्लॅन करीत आहेत. बस, कार, टॅक्सीद्वारे जम्मू-काश्मीरमधील काही अतिरेकी राजधानीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहे. यानंतर काश्मीरमधील सर्व अतिथी गृह, हॉटेल्स, वाहनांचा तपास सुरू आहे. दिल्लीतील सर्व बसस्थानक, रेल्वे स्थानकांवरही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली आऊटर उत्तर जिल्ह्यातील भागात विशेष लक्ष ठेवण्यात सांगण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील 4 ते 5 दहशतवादी ट्रकमध्ये बसून दिल्लीकडे रवाना झाले आहेत. ही माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. या इनपुटनंतर दिल्लीला हाय अलर्ट वर ठेवण्यात आले आहे.मोठा दहशतवादी कट रचण्याच्या उद्देशाने दिल्लीत प्रवेश केल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्व जिल्हा डीसीपी, विशेष सेल गुन्हे शाखेच...

कोरोना ही शेवटची महासाथ नाही, पुढील आव्हानांसाठी तयार राहा; WHO ने केलं सावध

Image
कोरोना ही शेवटची महासाथ नाही, पुढील आव्हानांसाठी तयार राहा; WHO ने केलं सावध नवी दिल्ली :  सध्या संपूर्ण जग कोरोनाव्हायरसशी (coronavirus) लढतं आहे. कोरोनाव्हायरसवरील उपचार, त्याविरोधातील लस आणि औषधं शोधण्यात जुटलं आहे. मात्र कोरोना ही शेवटची महासाथ नाही तर यापुढे अनेक आव्हानांचा सामना आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी तयार राहावं लागेल, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन (Dr. Soumya Swaminathan) यांनी सावध केलं आहे. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं, "आम्ही 80 देशांचा सर्व्हे करण्यात आला. त्यापैकी निम्म्या देशांनी अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याची योजना होती. त्यांनी अत्यावश्यक सेवांची यादी तयार केली होती. फक्त 35 टक्के देशांनी यासाठी संसाधने ठेवली होती" "कोरोनाच्या परिस्थितीत ज्या सेवांवर परिणाम होतो आहे, त्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकावर आहे ते लहान मुलांचं लसीकरण. जवळपास 80% देशांमधील लसीकरण अंशतः किंवा पूर्णपणे ठप्प झालं आहे. हे खूप गंभीर आहे. त्यामुळे गोवरसारख्या आजारांचा उद्रेक होताना आपल्याला दिसेल जो मोठ्या झपाट्याने पसरतो", अश...

सूर्यग्रहणामुळे मंदिरात केली पूजा, नदीत स्नान करताना पिता पूत्रावर काळाचा घाला

Image
सूर्यग्रहणामुळे मंदिरात केली पूजा, नदीत स्नान करताना पिता पूत्रावर काळाचा घाला यवतमाळ :  सगळीकडे पितृ दिवस साजरा होत असताना राज्यात पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी शहरातून वाहणाऱ्या वाघाडी नदीत बुडून वडिलांसह एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय शिवाप्रसाद अग्रहारी आणि आदित्य संजय अग्रहरी असं मृत बापलेकाच नाव आहे. अग्रहरी कुटुंबाने सूर्यग्रहण असल्याने बेलोरा रोडवरील वाघाडी नदीच्या काठावरील शनी मंदिरात पूजापाठ-विधीचे आयोजन केले होते. सूर्यग्रहण संपल्यानंतर ही विधी आटोपली आणि संजय अग्रहरी आणि त्यांचा मुलगा आदित्य हे दोघे नदी काठावर स्नान करण्यासाठी गेले. अंघोळ करत असताना ते खोल पाण्यात गेले. तेव्हा पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे ही बुडाले. यात दोघांचाही मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी नदीच्या पाण्यात उतरून दोघांचेही मुर्तदेह बाहेर काढले आहेत. तर काही स्थानिकांनी घटनेच...

पत्नी झोपेत असताना अंगावर पेट्रोल टाकून दिले पेटवून

Image
पत्नी झोपेत असताना अंगावर पेट्रोल टाकून दिले पेटवून  बीड :  पती-पत्नीच्या शुल्लक भांडणाच्या रागातून पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा  धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील चकलांबा येथे उघडकीस आली आहे. यात पत्नी 40 टक्के भाजली असून तिच्यावर अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. पती व सासरच्या मंडळींनी झोपलेलं असताना पेट्रोल टाकून पेटवून दिले असं पीडिता संगीता खेडकर हिने सांगितलं आहे. घटना घडल्यानंतर तब्बल चार दिवसांनी माहेरच्या मंडळीला सांगितलं की, रॉकेलच्या चिमणीचा अंगावर भडका झाल्याने पेट घेतला असं खोट सांगून पोलिसांमध्ये जाब दिला. माझ्या मुलीला जावई गणेश खेडकर व सासरच्या मंडळींनी पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप पीडित महिलेच्या वडिलांनी केला आहे. पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रकार हा गंभीर आहे, सासरच्या मंडळीकडून सतत या पीडित महिलेला त्रास दिला जात होता. त्यामुळे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या वर गुन्हा दाखल करा,' अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्ये माऊली सिरसाट यांनी केली. या प्रकरणात चकलांबा पोलीस स्टेशनमध्ये संगीताच्या वडि...

Fathers Day दिवशीच मुलाने पुसलं आईचं कुंक, महाराष्ट्र हादरवणारी घटना

Image
Fathers Day दिवशीच मुलाने पुसलं आईचं कुंक, महाराष्ट्र हादरवणारी घटना लातूर :  आज सगळीकडे पितृ दिवस साजरा होत आहे. पण दिवसाला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात समोर आली आहे. फादर्स डे दिवशी जन्म दात्या पित्याचा मुलानेच खुन केला असल्याचं समोर आलं आहे. असाच प्रकार चाकूर तालुक्यातही समोर आलं आहे. जिल्ह्यात फादर्स डे दिवशिच दोन तालुक्यात दोन पित्याच्या क्रूर हत्येनं अवघा महाराष्ट्र हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही घटनेत शेतीचा वाद पित्यास भोवला असून पोटच्या मुलांनीच स्वतःच्या पित्याची हत्या केली आहे. या घटनेत चारजन जखमीदेखील झाले आहेत. शेतीच्या किरकोळ वादातून भोसलेवाडीत ही घटना घडली आहे. तर फादर्स डेच्या पूर्व संध्येला लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात मुलाने जन्मदात्या पित्याचा खून केल्याच समोर आलं आहे. निलंगा तालुक्यातील भोसलेवाडी या गावात पंचप्पा धुप्पाधुळे यांची वडिलोपार्जित शेत जमीन आहे. पावसाने चांगली साथ दिल्यामुळे त्यांनी पेरणी सुरू केली. या शेत जमिनीचा वाद आहे. त्यांचा मुलगा नागनाथ यांचा वडिलांशी वाद होता. वडिलांनी पेरणी सुरू का केली ...

दोन गटात तुफान राडा, तरुणाच्या डोक्यात घातला दगड; दुचाकी पेटवली

Image
दोन गटात तुफान राडा, तरुणाच्या डोक्यात घातला दगड; दुचाकी पेटवली   हिंगोली जिल्ह्यातील देवाळा गावाजवळ दोन गटात तुफान राडा झाला आहे. यामध्ये एक दुचाकी पेटवून देण्यात आली असून एक जण जखमी झाला आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील जवळील एका हॉटेल जवळ हिंगोली शहरातील एक गट व अन्य एका गटामध्ये काही कारणास्तव शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर हा वाद वाढल्याने दोन्ही गटातील तरूण दुचाकीवरून हिंगोली – लाख मार्गावरील देवाळा गावाच्या समोर येऊन थांबले. या दोन्ही गटात पुन्हा बाचाबाची झाली व वाद निर्माण झाला, या राड्यात एका तरुणाच्या डोक्याला दगड लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे. तर एक स्कुटी जाळून टाकण्यात आली आहे. रस्त्याच्या मधोमध दुचाकी जळत असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, घटनास्थळी ग्रामीण पोलीस दाखल झाले. जळत असलेली दुचाकी पाणी टाकून विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र यामध्ये संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता.

लॉकडाउनचा फटका : तेलंगणातील मुख्याध्यापक विकतायत इडली, काही शिक्षक बनले विमा एजंट

Image
लॉकडाउनचा फटका : तेलंगणातील मुख्याध्यापक विकतायत इडली, काही शिक्षक बनले विमा एजंट शाळा बंद असल्यामुळे शिक्षकांच्या नोकरीवर टाच आपल्या पत्नीसोबत इडली विकताना रामबाबु करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने मार्च महिन्यापासून संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर केलं. ४ टप्प्यांमध्ये हे लॉकडाउन चालल्यानंतर आता हळुहळु सरकारने काही गोष्टी पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. या लॉकडाउनचा फटका देशातील अनेक घटकांना बसला. इतर राज्यात कामासाठी येणारे परप्रांतीय मजूर या लॉकडाउनमध्ये चांगलेच भरडले गेले. याव्यतिरीक्त अनेक उद्योगधंदे ठप्प झाल्यामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. इतकच नव्हे तर शिक्षण क्षेत्रातही या लॉकडाउनचा फटका बसला आहे. अनेक शिक्षक आणि मुख्याध्यापकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. अचानक रोजगार तुटल्यामुळे आता अनेक शिक्षकांना रस्त्यावर उतरून छोटे-मोठे उद्योगधंदे करावे लागत आहेत. इंडियन एक्सप्रेसने लॉकडाउनचा फटका बसलेल्या देशभरातील काही शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्यावर आता काय परिस्थिती ओढावली आहे, याचं वार्तांकन केलं आहे. मारगनी रामबाबु, वय ३६, मुख्याध्यापक महिन्याचा ...

करोनावर औषध : भारतात ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन घेण्यास, विकण्यास दोन कंपन्यांना परवानगी

Image
करोनावर औषध : भारतात ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन घेण्यास, विकण्यास दोन कंपन्यांना परवानगी करोना रुग्णांसाठी दिलासा देणारी बाब जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार करोना व्हायरसवर जे औषध प्रभावी ठरतंय, त्या औषधाचं आता भारतात उत्पादन होणार आहे. एवढंच नाही तर त्याची विक्रीही करता येणार आहे. त्या औषधाचं नाव आहे रेमडेसिवीर. भारताच्या औषधी महानियंत्रक विभागानं या रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादनासाठी हेटेरो आणि सिप्ला या दोन कंपन्यांना परवानगी दिली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. रेमडेसिवीर हे औषध महाराष्ट्र सरकारलाही हवे होते. त्यासाठी बांगलादेशातून त्याची आयात करण्यात येणार होती. मात्र, काही कारणास्तव ही आयात थांबवण्यात आली आहे. आता भारतातच त्याचे उत्पादन होणार असल्याने करोना रुग्णांसाठी ही बाब दिलासा देणारी आहे. सूत्रांच्या हवाल्यानं पीटीआयनं म्हटलंय की, जे करोना पॉझिटिव्ह रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत ‘केवळ त्यांच्यासाठी’ हे रेमडेसिवीर औषध वापरण्यात येणार आहे. यासाठी त्याचं उत्पादन आणि विक्री यासाठी हेटेरो आणि सिप्ला या कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी औषधी महानियंत्रक...

कंकणाकृती नव्हे; महाराष्ट्रात दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण

Image
कंकणाकृती नव्हे; महाराष्ट्रात दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण औरंगाबादः खगोलप्रेमींसाठी पर्वणी असलेले सूर्यग्रहण रविवारी (२१ जून) अनुभवता येणार आहे. सूर्यग्रहण सकाळी दहा वाजता सुरू होणार असून पुढील साडेतीन तास पाहता येणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती दिसणार नसून महाराष्ट्र आणि इतर राज्यात खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे.या वर्षातील पहिले सूर्यग्रहण रविवारी पाहता येणार आहे. या दिवशी ज्येष्ठ अमावास्या असून सकाळच्या वेळात ग्रहण आहे. या ग्रहणाच्या आधी व नंतर येत असलेल्या पौर्णिमेला दोन चंद्रग्रहण होणार आहेत. ओमान व भारतात केवळ सहा महिन्यात दोन कंकणाकृती सूर्यग्रहण पहाण्याची संधी मिळाली आहे. उत्तर भारतात राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या उत्तरेकडील भाग व उत्तरांचल प्रदेशात काही ठिकाणी सूर्यग्रहण कंकणाकृती स्वरुपात दिसणार आहे. तर महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांमध्ये हे सूर्यग्रहण खंडग्रास स्वरुपात दिसणार आहे, असे खगोलतज्ञ डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.यावेळी खूप कमी कालावधीसाठी कंकणाकृती स्थिती अनुभवता येणार आहे. भारतातील कंकणाकृती स्थिती ३३ ते २८ सेकंद दरम्यान आहे. हे सूर्यग्रहण झाल्यानंतर ...

घरून निघाली वरात, अर्ध्या रस्त्यातच कोरोना रिपोर्ट घेऊन आले अधिकारी आणि...

Image
घरून निघाली वरात, अर्ध्या रस्त्यातच कोरोना रिपोर्ट घेऊन आले अधिकारी आणि... अमेठी :  उत्तर प्रदेशमधील अमेठी जिल्ह्यात कोरोना संसर्गाशी संबंधित एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. लग्नासाठी वरात घेऊन नवरा मुलगा निघाला आणि रस्त्यातच त्याला वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रोखलं. एकच गोंधळ उडाल्यानंतर कळलं की, वराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळं अर्ध्या रस्त्यातूनच वरात परतली. आता वराच्या वडिलांसह 10 जणांना गौरीगंज जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये अमेठीतील नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. सर्व दिल्लीहून आले होते. यातील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या तरुणाचे शुक्रवारी लग्न होते. सदर युवकाने 16 जून रोजी कोरोना चाचणी केली. शुक्रवारी संध्याकाळी त्याचा कोरोना रिपोर्ट आला. तोपर्यंत त्याची वरात निघाली होती. प्रशासनानं रोखली वरात तरुणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अधिकारी त्वरित कारवाईस लागले. प्रशासनाने आपली सक्रियता दर्शवित वरात थांबवली. वर आणि काही वऱ्हाड्यांना आधीच सोडले होते. वैद्यकीय पथक आल्यावर त्यांना कोरोना पॉझिटिव्ह वर सापजला ना...

युवतीने वडिलांचं गुप्तांग कापून केलं ठार, म्हणाली 'रात्री शांतपणे लागली झोप'

Image
युवतीने वडिलांचं गुप्तांग कापून केलं ठार, म्हणाली 'रात्री शांतपणे लागली झोप' बँकॉक :  महिला बलात्काराच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. असाच एक भयानक प्रकार समोर आला आहे. एका 29 वर्षीय तरुणीने तिच्या वडिलांचे लिंग चाकूने कापल्याची घटना घडली आहे. महिला 10 वर्षांची असल्यापासून वडिल तिचं रोज लैंगिक शोषण करत होता. यालाच कंटाळून तरुणीने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे खरंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे.रोज होणाऱ्या त्रासाला वैतागून तरुणीने वडिलांचं गुप्तांग कापण्यासारखं एक भयानक पाऊललं. कित्येक वर्षांपासून ती या अत्याचाराने दु: खी होती अशी माहिती तिने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी घराची झडती घेतली असता कचऱ्याच्या डब्यात रक्ताने माखलेला चाकू पोलिसांच्या हाती लागला. तर हा चाकू तरुणीनेच कचऱ्याच्या पेटीत टाकल्याचं सीसीटीव्ही फूटेजदेखील पोलिसांच्या हाती लागलं आहे. या प्रकरणी तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. वडिलांच्या निधनानंतर लेक म्हणाली- मला शांतपणे लागली झोप तरुणीने गुप्तांग कापल्यामुळे रक्तस्त्राव झाला आणि यात 58 वर्षांच्या वडिलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या म...

भारतावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत आहे चीन, या 'Email Id' पासून सावधान

Image
भारतावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत आहे चीन, या 'Email Id' पासून सावधान नवी दिल्ली :  गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये वाद सुरू आहे. अशात गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यानंतर चीन आता भारतावर आणखी एक हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. दोन्ही देशांमधल्या या वादाचा फायदा घेत चीनमधल्या हॅकर्सने भारतातील महत्त्वाच्या केंद्रावर सायबर हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. हा सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स एका ईमेलचा वापर करत असल्याचंही समोर आलं आहे. एबीपी न्यूजमध्ये प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, 21 जूनला चीन भारतावर सायबर हल्ला करू शकतं. यासाठी चीनच्या हॅकर्सनी 20 लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा प्लान केला आहे. यामध्ये एक ईमेल आयडीदेखील समोर आला आहे. त्यांसंबंधी काही महत्त्वाच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चीनी हॅकर्स एका ईमेलच्या माध्यमातून भारतावर सायबर हल्ला करणार आहे. यामध्ये अनेक भारतीयांची खासगी आणि आर्थिक माहिती उघड होण्याची भीती आहे. चीनने भारतील रेल्वे आणि बँकिंग सिस्टम हॅक करण्यास सुरूवात केली असल्याचंही सांगण्यात येत आहे....

पासपोर्ट धारकांनो काळजी घ्या; सायबर विभागानं केलं महत्वाचं आवाहन

Image
पासपोर्ट धारकांनो काळजी घ्या; सायबर विभागानं केलं महत्वाचं आवाहन बनावट पासपोर्टद्वारे फसवणुकीचे प्रकार समोर सध्याच्या काळात भारतीय पासपोर्टचा साचा (template) डार्कनेटवर आणि इंटरनेटवर काळ्या बाजारात सहजपणे उपलब्ध आहेत. याचा दुरुपयोग करुन लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा बनावट पासपोर्टपासून सावध रहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे. सायबर फसवे अशा टेम्लेट्स साधारण ९ ते २३ डॉलर या दरात विकत घेतात आणि त्यामध्ये आवश्यक तो बदल करुन बनावट पासपोर्ट बनवतात आणि त्याचा वापर करून सिमकार्ड विकत घेतात. अशा बनावट ओळखपत्रांचा उपयोग करून विकत घेतली जाणारी सिम कार्ड ही ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यासाठी व अन्य विघातक कृत्यांसाठी वापरली जात असल्याचे समोर आले आहे.  पासपोर्टच्या स्कॅन कॉपीजना पासवर्ड देऊन सुरक्षित करा याबाबत महाराष्ट्र सायबर विभागाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “सावध रहा! तुमचा पासपोर्ट कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका. तुमच्या पासपोर्टच्या स्कॅन कॉपीजना पासवर्ड देऊन सुरक्षित करा, ज्यामुळे तुमच्याशिवाय अन्य कोण...